आलोक राय यांनी स्वतःच पूर्वी इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचे ‘हिंदी राष्ट्रवाद’ हे हिंदीतील पुनर्लेखन. हे पुस्तक संस्कृतनिष्ठ भाषेच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आणि हा प्रश्न फक्त हिन्दीचाच नाही, तर अनेक भारतीय भाषांचा आहे हे मांडते. शब्दांचं आपल्या भाषांमधील साहचर्य आणि वापराची परंपरा यावरून ते सहजसोपे की बोजड वाटतात हे ठरतं. मराठीतही प्राकृत आणि फार्शी-अरबी शब्द सहजतेने रुळले असले, तरी संस्कृत शब्दांना प्रोत्साहन देण्यात आलं आहे. आलोक राय यांनी हिन्दीच्या इतिहासात संस्कृतीकरणापासून ते धार्मिक राष्ट्रवादापर्यंतच्या घडामोडींचा उलगडा केला असून, महात्मा गांधींच्या हिन्दुस्तानी स्वप्नाचा उहापोह केला आहे. पुस्तकात हिन्दी-उर्दू संघर्षाचा भाषिक आणि धार्मिक पैलू 1840 पासून, विशेषतः 1857 नंतर चा काळ हा सर्व घटनाक्रम आणि त्यांचा आशय ओघवत्या शैलीत मांडला आहे. ह्या पुस्तकातील आलोक राय यांच्या निवडक मर्मदृष्टी उलगडून सांगितल्या आहेत, आयआयटी कानपूर येथील भाषा विज्ञानाचे प्राध्यापक डॉ. चिन्मय धारूरकर यांनी.

